नमस्कार मित्रांनो,
ओम नमो नारायणा मित्रांनो श्री स्वामी समर्थ. कर्ज काढण्याची कुणाची इच्छा नसते, मात्र कधी कधी आपली मजबुरी असते आणि आपल्याला कर्ज काढावं लागत. नंतर अशी परिस्थिती बनत जाते की, आपल्याला या कर्जाचे हफ्तेसुद्धा वेळेवरती फेडता येत नाही.
ह ळू ह ळू या कर्जाचा डोंगर आपल्यावरती निर्माण होतो. मित्रांनो या कर्जाच्या ओज्याखाली अनेकजण दबून जातात. काय करावं हे सूचत नाही. मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थांनी कर्जासंबंधी सांगितलेल्या काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी पा ह णा र आहोत.
श्री स्वामी समर्थ म्हणतात की, कर्ज काढण्यासाठी मंगळवारचा दिवस कधीच निवडू नये. मंगळवारी घेतलेले पैसे किंवा मंगळवारी घेतलेल कर्ज हे लवकर फिटत नाही. कर्ज घेण्यासाठी मंगळवारचा दिवस अशुभ आहे.
मात्र आता आपण जर क र्ज घेतलेले आहे तर, या कर्जाचे पैसे फेडण्यासाठी म्हणजेच कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी आपण मंगळवारचा दिवस निवडा.मंगळवारी जर आपण कर्जाचे पैसे देऊन कर्ज फेड केली तर हे कर्ज खूप लवकर उतरत.
मंगळवार प्रमाणेच शुक्रवार सुद्धा कर्ज फेड करण्यासाठी अंत्यंत शुभ मानला जातो. मित्रांनो या सोबतच काही काही असे ज्योतिष उपाय आहेत की, त्यामुळे आपण लवकर कर्ज फेडू शकता. श्री स्वामी समर्थ म्हणतात की, जर तुम्ही कुणाकडून कर्ज घेतल असेल,
तर त्यातले पाच दहा हजार रुपये त्वरित परतफेड म्हणून परत करा. म्हणजे तुम्ही समजा 1 लाख किंवा 2 लाख कर्ज घेतलं असेल, तर चार ते पाच हजार रुपये तुम्ही ता ब ड तो ब त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरा. अस केल्याने कर्ज लवकर उतरत.
मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये भगवान श्री गणेशाना कर्ज मुक्तीसाठी अंत्यंत मोठ महत्व दिलेलं आहे. अस म्हणतात की, जी व्यक्ती श्री गणेशांची दररोज मनोभावे पूजा करते आणि श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा आणि अक्षतचा वापर करते त्या व्यक्तीच कर्ज खूप लवकर नील होत.
मित्रांनो श्री गणेशांप्रमाणेच आपण हनुमानांची सुद्धा अगदी विधिवत दररोज मंगळवारी पूजा करा. श्री हनुमानांना दर मंगळवारी प्रसादासोबत 2 लवंग अर्पण करा. त्यामुळे सुद्धा कर्ज मुक्ती खूप लवकर साध्य होते, कर्ज लवकर फेडल जात.
मित्रांनो लाल मसूर सुद्धा कर्ज मुक्तीसाठी, कर्ज फेडण्यासाठी वापरात येते. ज्योतिष शास्त्रानुसार आपण लाल रंगाची त्या मसुरीच दान म्हणजे जी लाल रंगाच्या मसुरीची डाळ आहे हीच दान कोणत्याही गरिबास, कोणत्याही गरजू व्यक्तीस आवश्य करा.
लक्षात घ्या समोरची व्यक्ती ही गरजू असायला हवी. ती गरीब असायला हवी. त्या व्यक्तीला जर या लाल मसूर डाळीचं दान केलं तर, त्यामुळे सुद्धा कर्जातून खूप लवकर मुक्तता होते. मित्रांनो अजून 1 उपाय आहे. आपण यातील कोणताही 1 उपाय किंवा एकापेक्षा जास्त उपाय करू शकता.
श्री स्वामी समर्थ अस म्हणतात की, बऱ्याचदा आपण पैसे एखाद्याला देतो मात्र उधार दिलेले पैसे हे परत येत नाहीत. श्री स्वामी समर्थ म्हणतात की, बुधवारच्या दिवशी पैसे कोणासही उधार देऊ नयेत. कारण बुधवारी उधार दिलेले पैसे हे परत येत नाहीत, हे पैसे शक्यतो बुडतात.
तसच या पैशांची वसुली करण्यास प्रचंड त्रास होतो. मग पैसे कोणत्या दिवशी द्यावेत. स्वामी समर्थ म्हणतात की, गुरुवार हा दिवस पैसे देण्यास अंत्यंत चांगला आहे. जर तुम्ही गुरुवारी एखाद्या व्यक्तीस पैसे दिले तर ते पैसे परत मिळण्याची हमी असते.
मित्रांनो लाल गुलाबाचा 1 उपाय आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये दिसून येतो. जो उपाय कर्ज फेड करण्यास, कर्ज नील करण्यास अंत्यंत मदतकार ठरतो. आपण 5 गुलाबाची फुले घ्यावीत. ही फुल कोणत्याही प्रकारे सुखलेली नसावीत. त्याची प्रत्येक पाकळी त्या ठिकाणी असायला हवी.
5 गुलाबाची फुल आपल्या उजव्या हातात घेऊन आपण आपल्या देवघरासमोर बसावं. आणि गायत्री मंत्राचा केवळ एकवेळा जप करावा. किंवा जर शक्य असेल तर आपण 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. आणि त्यानंतर ही पाचीच्या पाच फुल आहेत ती आपण एखाद्या जवळपासच्या पाण्याच्या स्रोतामध्ये वाहित करा.
मग तो जो स्त्रोत आहे तो स्त्रोत नदी असेल, छोटासा ओढा असेल किंवा एखादा सरोवर असेल, शक्यतो पाणी वाहत असावं. जर वाहत पाणी तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ते भांड भरून पाणी घ्या. आणि त्यामध्ये ही गुलाबाची फुल टाका.
आणि त्यानंतर हे पाणी आपण कोणत्याही झाडाच्या बुंदयाशी टाकू शकता. आणि ती फुलसुद्धा त्या झाडाच्या
बुंदयाशी आपण टाका. मित्रांनो हा उपाय सुद्धा कर्ज मुक्तीसाठी मोठया प्रमाणात केला जातो.
तर मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनातील कर्ज लवकर फिटो, कर्ज लवकर फेडण्यासाठी तुम्हाला योग्य दिशा मिळो यास मनोकामनेस आम्ही थांबत आहोत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेअर करा.
अशाच आणखी महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळण्यासाठी मिळण्यासाठी आत्ता आपल्या वायरल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.