नमस्कार मित्रांनो,
हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्मांपैकी एक आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अनेक परंपरांचे पालन करतो. त्यापैकीच एक महत्त्वाची परंपरा आहे चरणस्पर्श. चरणस्पर्शाचा अर्थ म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या जेष्ठ असणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणं. ज्या व्यक्ती नात्याने आपल्यापेक्षा मोठा आहेत अशा व्यक्तींच्या पाया तर आपण पडतो त्यांचे चरण स्पर्श करतो.
पण मित्रांनो यापाठी मागे अनेक कारणे आहेत. मात्र 3 व्यक्ती अशा आहेत की, ज्या व्यक्तीच्या आपण चुकूनही पडू नये असं म्हटलं जातं. कोणत्या आहेत त्या 3 व्यक्ती आणि त्यांच्या पाया पडल्याने असा कोणता गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागू शकतं चला जाणून घेऊया.
मित्रांनो आपण आपल्या आई-वडिलांच्या, आजी-आजोबांच्या, संत महात्म्यांच्या पाया पडतो. तेव्हा आपले हात हे त्यांच्या चरणांना स्पर्श करत असतात आणि त्यांचे हात आपल्या डोक्यावर किंवा आपल्या पाठीवर पडतात.
या प्रक्रियेद्वारे आपल्या आई-वडिलांच्या शरीरातील स का रा त्म क ऊर्जा किंवा त्यांच्या मनामध्ये आपल्या प्रति असलेलं प्रेम, वात्सल्य आणि आशीर्वादरूपाने आपल्यामध्ये प्रवाहित होत असत. याच आशीर्वादाच्या स का रा त्म क उर्जेचा जोरावर आपण प्रत्येक कामामध्ये यश मिळवतो.
आपण जे काही कार्य करतो त्यामध्ये आपल्याला सद्सद्विवेक बुद्धीने काम करता येत. त्या प्रत्येकामध्ये यशप्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला सांगितलं जातं की, सकाळी उठल्याबरोबर आपण घरातल्या मोठ्यांचे आ शी र्वा द घ्यायला हवे.
जेणेकरून आपल्यामध्ये स का रा त्म क उर्जेचा संचार होईल. आता वळूया त्या 3 लोकांकडे ज्यांच्या पाया चुकूनही पडायचे नाही. त्यामध्ये सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे आपला शत्रू. अशा कलियुगामध्ये सर्वच लोक चांगले नसतात.
काही लोकांचे आपल्याबरोबर शत्रुत्व असते तर शत्रुत्व जरी नसले तरी काहींच्या मनामध्ये आपल्याबद्दल असूया आणि द्वेष असतो आणि आपली प्रगती त्यांना पाहावत नाही असं सुद्धा वाटतं. अशा लोकांच्या कधीही पाया पडू नका. त्यांचे चरण स्पर्श कधीही करू नका.
कारण या लोकांमध्ये तुमच्याप्रती सतत न का रा त्म क भाव असतात आणि त्याचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. तुमच्याविषयी सतत न का रा त्म क विचार ही लोक करत असतात आणि म्हणूनच त्यांच्या शरीरामध्ये साठलेली न का रा त्म क ऊर्जा पाया पडताना आपल्या शरीरात प्रवाहित होते. ज्याचा घातक परिणाम आपल्यावर होऊ शकतो असं म्हटलं जातं.
त्यामुळे तुमची चालू असलेली प्रगती थांबू शकते. तुमच्या चालू कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात तुमचं मन तुमच्या कामावरून हटू सुद्धा शकते किंवा तुमच्या कुटुंबामध्ये वाद विवाद निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच आपल्या शत्रूच्या कधीही पाया पडू नका.
त्याचबरोबर दुसऱ्या प्रकारची व्यक्ती आहे आळशी, दुष्ट आणि चरित्रहीन व्यक्ती. मित्रांनो जगामध्ये धर्मानुसार वागणारी लोक फार कमी आहेत. जे लोक पापी आहेत आपल्या हिंदू धर्माचे पालन करत नाही जे चारित्र्यहीन आहेत त्यांच्यात खूप आळस आहे अशा लोकांच्या पाया कधीही पडू नका.
जर तुम्ही ही कृती केली तर त्या लोकांचे दुर्गुण आपल्यामध्ये येऊ शकतात आणि आपण आपल्या कर्तव्यापासून आपण भ्रष्ट होऊ शकतो. म्हणून अधार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पायासुद्धा किंवा अनैतिक लोकांच्या पाया सुद्धा कधीही पडू नये असं म्हटलं जातं.
त्यानंतर तिसरे लोक आहेत अनोळखी लोक. मित्रांनो अनोळखी लोकांचा स्वभाव आपल्याला माहीत नसतो. त्यांच्या कर्मांबद्दल सुद्धा आपण काहीही जाणत नसतो. अशावेळी त्यांच्या पाया पडणं हे सुद्धा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकत आणि म्हणून अनोळखी लोकांच्या पाया चुकूनही पडू नये.
मित्रांनो पाया त्याचच पडावं जी लोक आपल्यापेक्षा फक्त वयानेच नाही तर मानाने सुद्धा मोठी आहेत विचारांनी मोठी आहेत. त्या लोकांच्या चरणस्पर्श आपण नेहमी करावे. आपल्या घरामध्ये ज्येष्ठांचा आदर केला जावा. ज्येष्ठांचा अपमान आपण कधीही करू नये. कारण ज्येष्ठांच्या आशीर्वादानेच आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करत असतो.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.