नमस्कार मित्रांनो,
वास्तुशास्त्रानुसार घराची दिशा आणि त्याची रचना यामध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. घर बांधताना वास्तूच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास नकारात्मक ऊर्जा राहते, असे वास्तुशास्त्र तज्ज्ञांचे मत आहे.
अशा स्थितीत घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार करण्यासाठी घरात काही बदल केले पाहिजेत.
कधी कधी आपल्याला छोट्या चुकांची मोठी किंमत चुकवावी लागते. वास्तूशी संबंधित झालेल्या चुकांमुळे अनेकदा कठीण प्रसंग उद्भवतात. घरातील आनंदी वातावरण नाहीसं होतं.
घरातील देव्हारा – वास्तुशास्त्रानुसार, घरातील देव्हाऱ्याची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य बाजू. त्यामुळे घर बांधताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. तसेच देव्हारा थोड्या उंचीवर असावा.
घड्याळाची दिशा – वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य ठिकाणी घड्याळ लावले नसेल तर जीवनात अनेक आर्थिक समस्या येतात. वास्तूनुसार घरामध्ये घड्याळ कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावू नये. घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं चांगलं मानलं जातं.
तुळस – हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावावे, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. याशिवाय घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. अशा प्रकारे तुळशीचे रोप लावल्यास आर्थिक अडचणी दूर होतात. सोबतच घरात आनंद अबाधित राहतो.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.