नमस्कार मित्रांनो,
भारतीय परंपरा आणि संस्कृती श्रद्धेला अधिक म ह त्त्व देणारी आहे. एखादी व्यक्तीची अनेक गोष्टींवर श्रद्धा असू शकते. कोणी आपल्या कामावर श्रद्धा ठेवतो, तर कोणी देवावर श्रद्धा ठेवतो, तर कोणी दोन्ही गोष्टींवर श्रद्धा ठेवतो. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. जवळपास सर्वच संतांनी थो तां ड चुकीच्या चालीरीती यावर जोरदार प्रहार केला. समाजाला उपदेश करताना स त्क र्म करण्यासह चुकीच्या गोष्टींना तिलांजली देण्याचे आवाहन केले.
पुरोगामी विचार गेल्या अनेक वर्षांपासून रुजवण्याचे काम केले जात आहे. स्वामी समर्थ महाराजांचा महिमाही आगात आहे. स्वामी समर्थांनी वेळोवेळी विविध घटनांतून समाजाला योग्य दिशा देणारे उपदेश शिकवण दिली. या घटनेत नेमके काय घडले ते जाणून घेऊया. एकदा गणपती बुवा स्वामींच्या दर्शनाला आले होते. मात्र स्वामींनी त्यांना हाकलवून दिले. स्वामींच्या या कृतीचे गणपती बुवांना फार वाईट वाटते. त्याच वेळी अक्कलकोटमध्ये एक साधू कृष्णास्वामी येतात.
आपण सा क्षा त कृष्णाचा अवतार असल्याचे कृष्णास्वामी लोकांना भासवायचे. कृष्णा स्वामींच्या गोड बोलण्याला गणपती बुवा अगदी भुले आणि त्यांच्या आहारी गेले. सावधगिरी बाळगा, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका असे स्वामी नेहमी सांगत. मात्र स्वामींची शिकवण गणपती बुवा विसरले आणि कृष्णा स्वामींच्या आहारी गेले. इथेच गणपती बुवा चुकले. कालांतराने गणपती बुवांचा मुलगा अकस्मात आजारी पडला. कृष्णा स्वामींवर आगात श्रद्धा असल्याने गणपती बुवा मुलाला वैद्यांकडेही नेले नाही.
एकदा कृष्णा स्वामींचे प्रबोधन सुरू असताना स्वामी समर्थ तिथे येतात. कृष्णास्वामी त्यांचा अपमान करतो. आपल्यासमोर स्वामी काहीच नाही असा असा अविभार्व मिरवतात पण स्वामी काही न बोलता मुकाट्याने तिथून निघून जातात. गावकरी कृष्णा स्वामीचा जय जयकार करतात. हा सर्व प्रकार पाहून गणपती बुवाची कृष्णा स्वामीवरची श्रद्धा वाढते. कृष्णास्वामी गावकऱ्यांना भूल घालायला लागले होते की तुम्ही मला धन, संपदा दान करा. त्या बदल्यात तुम्हाला दुप्पट धनप्राप्ती होईल असे सांगत फिरतात.
गावकरीही त्यांच्या आहारी जायला लागले होते. दुसरीकडे काही केल्या गणपती बुवांच्या मुलाचा आजार बरा होत नव्हता. उलट परिस्थिती गंभीर बनत जाते. चोळाप्पा कळकळीने त्यांना मुलाला स्वामींकडे नेण्याची विनंती करतात. गणपती बुवा चोळाप्पाला ढकलून देतात. चोळाप्पा पडणार तितक्यात मागून स्वामी समर्थ त्याला सांभाळतात. स्वामी गणपती बुवाला खूप रागवतात आणि म्हणतात की, अरे माणसा अजून तुला अक्कल आलेली नाही. इतके अनुभव घेऊनही चांगल्या वाईटाची पारख तुला कशी येत नाही. डोळे बंद करून असा कुणावर कसा विश्वास ठेवतोस.
मात्र गणपती बुवा तरीही काही ऐकायला तयार नसतात. मग स्वामी म्हणतात की, बघ तुझा कृष्णास्वामी काय करतो आहे. असे सांगून आपल्या साधनेच्या बळावर सर्व लोकांना समोरच्या भिंतीवर कृष्णा स्वामींचे कृष्ण कृत्य दाखवतात. त्या सर्वांना कृष्णास्वामी श्री शिष्यांसोबत नृत्य करताना, मद्यपान करताना आणि गावकर्यांनी दिलेल्या पैशावर मौज करताना दिसतात. ते दृश्य पाहून गणपती बुवांसकट सर्व गावकऱ्यांचे डोळे खाडकन उघडतात.
गणपती बुवा स्वामींची करुणा भाकतात. कृपासिंधू स्वामी गणपती बुवांच्या मुलाला खडखडीत बरा करतात. दुसरीकडे इकडे सर्व गावकरी कृष्णास्वामीला चोप देतात. कृष्णास्वामी पळत स्वामींना शरण येतो. स्वामी त्याला गाव सोडून जाण्याची आज्ञा करतात. कृष्णास्वामी शरमेने मान खाली घालून गाव सोडून निघून जातो. स्वामी पुन्हा एकदा उपस्थित गावकऱ्यांना उपदेश करतात की, श्रद्धा जरूर ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.