नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी आहात आणि रोज स्वामींची सेवा करत आहात तर तुम्ही नक्की ही माहिती संपूर्ण वाचा. कारण आजच्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला असे काम सांगणार आहे जे तुम्ही स्वामींच्या सेवेच्या आधी कराल. तर नक्कीच तुमच्या आयुष्यात कोणतीही दोष राहणार नाही तुमच्या पत्रिकेत कोणते दोष राहणार नाही.
आणि तुमचे जीवन सुद्धा सुखी होईल मित्रांनो हे काम तुम्हाला सेवा करण्याच्या आधी करायचं आहे. म्हणजेच आपल्या दिवसाची सुरुवात तुम्हाला या कामाने करायची आहे. मित्रांनो जर तुम्ही केंद्रातून स्वामींच्या मठाततून सेवा घेतली असेल तर या कामाबद्दल तुम्हाला सांगितलं असेल ती रोज आपल्या दिवसाची सुरुवात या कामाने करायची.
पण जर तुम्ही कोणाचे ऐकून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सेवा करत असाल किंवा तुमच्या इच्छेने सेवा करत असाल तर तुम्हाला या कामाची माहिती नसेल, तर तुम्हीसुद्धा सेवा करण्याच्या आधी म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात या कामाने करा. आणि मग दिवसभर तुम्हाला सेवा करायची जे करायचे ते करा.
पण दिवसाची सुरुवात या कामाने करा. आता हे काम काय आहे? आणि कसं करायचं? तर मित्रांनो तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी काहीच न करता काहीच न खाता-पिता एक तांब्यात पाणी घ्या. तांब्या कोणताही असला तरी काही हरकत नाही तांब्यात पाणी घ्या. आणि त्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद चिमूटभर कुंकू अक्षता टाका म्हणजे तांदूळ टाका.
फुल असतील तर फुले टाका नसतील तरी काही हरकत नाही. आणि ते पाणी घेऊन तुमच्या घराच्या बाहेरच्या किंवा टेरेसवर जा. आणि सूर्याच्या दिशेने उभे राहून सूर्य असेल तरी किंवा नसेल तरी तुम्हाला सूर्याच्या दिशेने उभा राहायचं आहे. म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड करून उभा राहायचा आहे. आणि आपल्या दोन्ही हातात तांब्या घेऊन आपल्या डोक्याच्या वर सरळ दिशेत तांब्या धरायचं आहे. आणि ते पाणी एका धारेमध्ये, एका रेषेमध्ये खाली सोडायच आहे.
आणि सूर्य असेल तर त्या पाण्याच्या आधारेमधून सूर्य देवाचे दर्शन घ्यायचे आहे. आणि पाणी सोडता सोडता तुम्हाला 11 वेळेस एक मंत्र बोलायचं आहे. ॐ सूर्याय नमः ॐ सूर्याय नमः या रीतीने पाणी सोडता सोडता म्हणजे हळुवार पाणी सोडायचे आहे. असं नाही घेतला तांबे आणि ओतला खाली. हळुवार एका आधारेत पाणी सोडायचे आहे.
जमिनीवर, टेरेसवर आणि सूर्य असेल तर सूर्यदेवाचे तुम्ही त्या धारेतून दर्शन घ्या आणि 11 वेळेस ॐ सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. मित्रांनो सूर्य देव म्हणजेच सूर्य हा ग्रह आपल्या पत्रिकेत सर्व उच्च कोटीवर असतो. त्यामुळे आपल्याला कोणतेही दोष होत नाही, कोणत्याही पीडा होत नाही आणि आपले जीवन सुखी होते. आणि या नंतर आपण जर कोणत्याही देवाची सेवा केली तर नक्कीच ती सेवा लाभदायक असते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.