नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थाचा उपदेश » सर्व धर्माचे सार हेच की, परोपकारार्थ अनिवार्य श्रम करावेत.
» प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये.
» विनाकारण दुस-यास पीडा देऊ नये.
» मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये.
» पक्षापक्ष भेद टाकून सत्य, न्याय, धर्म या मार्गाने असावे.
» परमेश्वर भजनी रत असावे. » कोणतेही र्दुव्यसन नसावे.
» योग्यायोग्य विचार असावा.
» अतिथी, अभ्यागतांस अन्न-पाणी द्यावे.
» न्यायाने, कष्टाने मिळविलेल्या पैशाने स्वहीत करावे, तसेच दुस-याचे हीत देखील करावे.
» परोपकारार्थ पाणपोई, विहीर, तलाव बांधावेत.
» प्रवाशांस उपयोगी पडतील अशा धर्मशाळा बांधाव्यात.
» दया-क्षमा-शांतीयुक्त चित्त असावे.
» ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे.
» आपले भोग हे चुकत नाहीत. ते भोगावेच लागतात. त्यातून दु:ख विशाद वाटय़ाला येतो. म्हणून नेमून दिलेले तुमचे काम करताना, ते हसत हसत करा.
मित्रांनो लेख आवडलाअसेल तर नक्कीच कंमेन्ट करा
तसेच आमच्या फेसबुक पेजला ”वायरल मराठी” याला नक्कीच लाईक करा . जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर पण् नक्कीच करा धन्यवाद. आपले आभारी आहोत.