नमस्कार मित्रांनो,
एक जटाधारी तपस्वी गोसावी रामेश्वर आदी तीर्थ ठिकाणी प्रवास यात्रा करीत होता यात्रा करत असताना त्याला जलोदर झाला. दिवसेंदिवस यांचे पोट फुगू लागले आणि अन्न खाता येत नव्हते. म्हणून त्याला चांगलाच अशक्तपणा आलेला होता. द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची त्यांची खूप इच्छा होती. परंतु व्याधीमुळे श्रीकृष्णाचे दर्शन होणे आता जवळजवळ अशक्य वाटत होते.
आणि यातच पायपीट करत गाणगापूर येथे आला. त्या ठिकाणी मुक्कामी राहिला तिथे त्याला अक्कलकोटमध्ये अवतारी विभूती आहे आपण त्यांचे दर्शन घ्यावे असे सांगितले. चार पाच दिवसांचा मुक्काम झाल्यानंतर तो अक्कलकोट येथेयेण्यास निघाला. पुन्हा पायपीट करत अक्कलकोटमध्ये आला. त्यादिवशी स्वामी महाराज नव्या विहिरी च्याकाठावर बसलेले होते. त्यावेळी तो कसाबसा चालत येतो आहे हे बघून सभोवताली जमलेल्या सेवेकऱ्यांकडे स्वामींनी बघितले.
आणि बोले अरे..त्या बैराग्याला मार्ग सांगा आणि त्याच्या हाताला धरून इकडे घेऊन या स्वामींनी असे बोलताच एक दोन लोक घाईघाईने पुढे गेली आणि त्या गोसाव्याच्या हाताला पकडून स्वामींकडे आणले. स्वामींची अजानुबाहू मूर्ती बघून गोसाव्याने स्वामींना नमस्कार केला. तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि हसून बोलले बैरागी बुवा..तुम्हाला श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची इच्छा आहे..ना ती नक्की पूर्ण होईल भरवसा ठेवा.
खरंतर स्वामींना आपण प्रथमच भेटतो आहे. मला श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायचे आहे हे स्वामींना कसे समजले. स्वामींचे हे अंतःसाक्षात्वचे बोलणे ऐकून गोसावी आश्चर्यचकीत झाला आणि माझ्या मनातील स्वामींना कसे समजले असा विचार करून तो मनातल्या मनात पुन्हा बोलू लागला. निशंक हे स्वामी तर परमेश्वरच आहेत. गोसाव्याने असे बोलताच पुन्हा स्वामी बोले अरे..आम्ही कोणीही असू दे तू त्या कडुनिंबाच्या झाडाची पाने खा. स्वामी हुकूमप्रमाणे मानून त्या गोसाव्याने पाला खाल्ला.
परंतु पाला कडू असल्याने त्याने लगेच थुंकून टाकला आणि स्वामींना बोलला स्वामी हा पाला खूपच कडू आहे कसा खाऊ गोसाव्याने असे बोलताच स्वामी हसले आणि बोले काय म्हणतोस! हा पाला कडू आहे? मग त्या बाजूच्या फांदीचा पाला खा! त्यात कडवटपणा नाही. स्वामी भक्तहो स्वामींच्या लीला अतर्क्य आहेत. गोसाव्याने स्वामी हुकुमाप्रमाणे बाजूच्या फांदीचा पाला खाल्ला तर खरोखर च म त्का र झाला. बाजूच्या फांदीवरील पाला अक्षरशः गोड लागत होता.
हा पाला फक्त गोसाव्यालाच नव्हे तर तेथे जमलेल्या लोकांनी खाऊन बघितला तर त्यांना सुद्धा गोड लागला. स्वामींची अतर्की लीला बघून गोसाव्याच्या डोळ्यात पाणी सुरू झाली आणि आश्चर्याने इतक्या दिवसाचा जलोदराचा त्रास मात्र अवघ्या तीनच दिवसात बरा झाला. स्वामी भक्तहो त्यानंतर त्या गोसाव्याची स्वामी चरणी आनंद भक्ती जडली. स्वामी महाराज तर प्र त्य क्ष परब्रह्म आहेत हे दृढता त्याच्या मनाला आली. पुढे स्वामींनी काय चमत्कार केला गोसाव्याची इच्छा कशी पूर्ण केली हे आपण पुढील स्वामी वाणी ऐकणार आहोत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
आजच्या स्वामी वाणीतून आपल्याला छान बोध मिळतो आहे तो असा की, आपण स्वामींना आपल्या इच्छा संकट व दुःख सांगा अथवा सांगू नका. स्वामींना आपल्या मनातील समजते आहे. बघा आजच्या लिलेत गोसावी मात्र आला. त्याने काहीही सांगितले नाही तो समोर येताच स्वामींनी त्याच्या मनातले ओळखले आणि त्याला त्याची इच्छा काय आहे हे बोलूनही दाखवले. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे तुजी इच्छा पूर्ण होईल भरोसा ठेव ही स्वामींची आधारवाणी खूपच प्रेरणादायी आहे.
म्हणून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी या लिलेतून बोध घेता हा अतुट अभद्य विश्वास ठेवायचा आहे की, स्वामींना आपल्या सर्व गरजा माहीत आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी पूर्वतयारी लागते त्या न का रा त्म क गोष्टी आडव्या येतात त्या दूर व्हाव्या म्हणून स्वामी महाराज आपल्याला सतत कर्म संकेत देऊन तयारी करून घेत असतात. हे कर्म करत असताना आपल्याला मेहनत करावी लागू शकते, कष्ट करावे लागू शकतात व कधीकधी प्रतिकूल परिस्थितीचा सामना सुद्धा करावा लागू शकतो.
आजच्या लिलेतील कडवट चव असलेला कडुनिंबाचा पाला हे असाच कष्टदायक कर्माचे प्रतीक आहे आणि गोड चव असलेला पाला आनंददायी मेहनत असलेल्या कर्माचे प्रतीक आहे. स्वामी भक्तहो असे त्रासदायक कष्ट करत असताना आपल्याला थकायचे नाही व हरायचे नाही. ह्या कष्टांना आनंददायी करायचे आहे. आणि यासाठी अशा कर्माना स्वामी सेवेचे स्वरूप द्यायचे आहे. हे कष्ट म्हणजेच स्वामीसेवा आहे अशा भावनेने जेव्हा आपण प्रामाणिक मेहनत करून तेव्हा जसे त्या कडूलिंबाच्या पाल्याचा कडवटपणा जाऊन त्याला गोडवा आला.
अगदी तसेच आपल्याला त्रासदायक वाटणारे कर्म हे आनंदी वाटतील. त्यांचा त्रास आपल्याला होणार नाही आणि जसा त्या गोसाव्याचा जलोदराचा त्रास नष्ट झाला. अगदी तसेच आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आडव्या येत असलेल्या न का रा त्म क गोष्टी नष्ट होतील. जसे एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत प्रथम क्रमांक आणायचा आहे आणि तो तशी प्रार्थना करतो परंतु त्याच्यामध्ये आळस आहे. तेव्हा सर्वप्रथम स्वामी त्याच्यातील आळस दूर व्हावा म्हणून कर्म संकेत देतील.
जेव्हा तो आळसाने अभ्यास करत असताना मध्येच उठेल तेव्हा त्याने अभ्यास करावा म्हणून घरातले ओरडतील आणि या धाकाने तो पुन्हा अभ्यासाला बसेल. अभ्यास करत असताना त्यांच्यातील आळशी स्वभावामुळे अभ्यास करणे त्याला खूपच त्रासदायक वाटेल. परंतु त्याने वेळीस विवेक जागृत करून हे ओळखले की, जे काही घडते आहे ते माझ्या प्रार्थनेचे उत्तर आहे.
तेव्हा तो स्वामींची इच्छा स्वामी सेवा म्हणून अभ्यास करेल आणि आळशी स्वभावाने होणारा त्रास त्यास जाणवणार नाही. आणि पुढे नक्कीच त्याचा प्रथम क्रमांक येईल. स्वामी भक्तहो अशी अनेक उदाहरणे आपल्या जीवनात आहेत. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया.
हे स्वामीगुरुराया तुमचे नाम इतके पवित्र आहे ना की, मुखातून उच्चारताच वाणी पवित्र होते. तुमचे पवित्र रूप जेव्हा डोळ्याने बघतो तेव्हा डोळे पवित्र होतात. हात जेव्हा तुमचे चरणांना स्पर्श करतात तेव्हा हात पवित्र होतात. हे परब्रम्ह आता तर आमच्या जीवनालाच तुमचा स्पर्श झाला आहे. आमचे संपूर्ण जीवनच पवित्र झाले आहे. हे आई असेच आम्हाला बालकांवर तुमची कृपा दृष्टी ठेवा आणि आमच्याकडून तुमची सेवा करून घ्या तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद स्वामी.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.