स्वामी समर्थांच्या गुरुचरित्राचे पारायण ज्यांना जमत नाही त्यांनी करा हा सोपा उपाय…

नमस्कार मित्रांनो,

स्वामी समर्थांच्या गुरुचरित्राचे पारायण ज्या व्यक्तींना काही कारणामुळे करणे जमत नाही. अशा व्यक्तींनी काय करावे हे आज आपण या लेखातून पाहणार आहोत. खूप लोकांची इच्छा असते की आपण स्वामींच्या गुरुचरित्राचे पारायण करावे पण हे पारायण करताना सुद्धा खूप गोष्टी लक्षात ठेवून कराव्या लागतात. जे बऱ्याच लोकांना करणे शक्य नसते.

अशाच काही लोकांसाठी हा सोपा उपाय मी आज या लेखाद्वारे तुम्हाला सांगणार आहे आपण स्वामींची सेवा करतोच पण श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये सर्वात मोठी सेवा मानली जाते. ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण. खूप लोक असे आहेत जे वर्षातून दोन ते तीन वेळा पारायण करतात. काहीजण दत्तजयंतीच्या एक आठवडा अगोदरपासून पारायणाला सुरुवात करतात.

तर काही लोक तीन दिवस करतात, काही सात दिवस, काही लोक नवरात्रीमध्ये पारायण करतात पारायण केल्याने आपले मन शांत राहते व मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. स्वामी
समर्थांची कृपादृष्टी राहते व स्वामींच्या सेवेचे लाभही मिळते. तसेच पारायनाचे नियम खूप हे कठीण व कडक असतात. जे पाळावेच लागतात.

अन्यथा पारायण केल्याचे फळ मिळत नाही. स्वामी प्रिय भक्त हो अशा नियमाचे पारायण दरम्यान पालन करणे गरजेचे असते. बरेच लोकांना या पारायणाचे नियम पालन करणे शक्य नसते. कोणाला आजारपणामुळे, वयोमानामुळे अजून काही समस्या असतात. आज कालच्या या धावपळीच्या जगामध्ये नोकरीसाठी, पोटासाठी धावपळ करावी लागते.

अशा खूप गोष्टींमुळे बऱ्याच लोकांना हे गुरुचरित्राचे पारायण करायला मिळत नाही किंवा जमत नाही ज्या लोकांना जमत नाही किंवा शक्य होत नाही तर अशा लोकांनी काय करावे? हे आपण आज बघणार आहोत. ज्यांना हे 52 अध्याय असलेले पारायण करायला जमत नाही किंवा शक्य होत नाही त्यांनी हा श्लोक रोज मनोभावाने बोलावा.

रोज सकाळी उठून जेव्हा देव पूजा करता किंवा कामासाठी बाहेर जातात तेव्हा हा चार ओळींचा श्लोक नक्की वाचावा किंवा बोलावा. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठपिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंहसरस्वती करंजग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीचिये संगमा तेथूनि मठ गणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा…

जर जसे आपण आता याचे श्रवण केले यावरून तुम्हाला कळाले असेल हा अगदी सरळ आणि सोपा असा चार ओळींचा श्लोक आहे. गुरुचरित्राचे पारायण केल्याने जे लाभ होणार आहेत हेच लाभ हे पठण केल्यानंतर सुद्धा होणार आहे. हे पठण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतील व या श्लोकांचे पठण केल्याने जे काही लाभ असतात ते सर्व मिळतात

श्री स्वामी समर्थ हे नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात. आपण कधी चुकलो तर आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याला मार्ग भेटला त्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात. म्हणजे सहन करण्याची शक्ती आणि लढण्याचे सामर्थ्य हे स्वामी महाराज आपल्याला देत असतात. हा श्लोक एका कागदावर लिहून ठेवा आणि रोज सकाळी देवपूजा करताना याचे पठण करा.

असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि पारायण केल्याचे पुण्यसुद्धा आपल्याला लाभेल. ॥ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरु अवधुत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *