स्वामी लोकांना म्हणतात..अरे..!! भितोस कशाला , तुझे भाग्य उजळले , तुझी इच्छा पूर्ण  होई पर्यंत हवे तितके घे…!!

नमस्कार मित्रांनो,

बसप्पा नावाचा अनन्य भक्त स्वामींची अनन्य सेवा करत असत..जिथे जिथे स्वामी तिथे तिथे बसप्पा..

बसप्पा गृहस्थाश्रमी होता. घरातील परिस्थिती नाजूक होती .पण स्वामी भक्तीचे त्याला इतके वेड लागले कि त्याचे घराकडे लक्षच नव्हते..

स्वामी सहवासात भरपूर ज्ञान स्वामीनी बसाप्पाला दिले.. त्याने पुन्हा प्रपंचात लक्ष द्यावे आणि स्थयिक व्हावे हे स्वामींच्या मनात यायला लागले..

ह्यातूनच एकदा फक्त बसाप्पा आणि स्वामी रात्री जंगलातून जात असतांना अचानक सर्प प्रगट झाले ..

हे सर्व बघून बसप्पा घाबरला ..तेव्हा स्वामी त्याला बोलले “ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ”

बसप्पा च्या काही लक्षात आले नाही पण स्वामी प्रती अनन्य भक्ती इतक्या उंचीवरची होती कि त्याने नि:शंक मनाने त्यातील काही सर्प झोळीत घेतले आणि घरी आले .

घरी आल्या नंतर जेव्हा बसाप्पाने झोळी बघितली तेव्हा त्या सर्पाचे सोने झालेले बघितले आणि आश्चर्याने स्वामी नामात नाचू लागला..

बोध — स्वामी भक्तीत राहिल्याने..स्वामींवर अतूट विश्वास ठेवल्याने स्वामी सापाचे (संकटांचे ) सोने (कृपा) करतात हा ह्या लीलेतून स्वामींचा संदेश होता..थोडक्यात ज्याचे स्वामींवर अनन्य भक्ती आहे त्यांनी संकटाना (सापाला) घाबरू नका कारण पुढे त्याचे सोनेच होणार आहे अशी स्वामी वाणी आहे .. धन्यवाद स्वामी ! कोटी कोटी धन्यवाद

आपला श्री स्वामी समर्थावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा . कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते .

तसेच आमच्या फेसबुक पेजला ”वायरल मराठी” याला नक्कीच लाईक करा . जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर पण् नक्कीच करा धन्यवाद. आपले आभारी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *