नमस्कार मित्रांनो,
आज आपण शनिवारी कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणती कामे करू नयेत हे पाहणार आहोत. शनिवार हा शनी देवांचा वार, सोबतच शनिवार हा भैरवनाथांचा वार सुद्धा मानला जातो. या दिवशी काही कामे अशी असतात जी केल्याने शनीचे दोष आपल्या पाठी लागतात आणि जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात, अडचणी वाढतात.
मित्रांनो ज्यांच्या जीवनात शनीची साडेसाती चालू आहे, दह्या अडीचकी चालू आहे, अंतर्दशा महादशा चालू आहे अशा लोकांनी तर ही कामे आवर्जून टाळावीत. शनिवारी ही कामे करू नयेत. जाणून घेऊया की, शनिवारी कोणती कामे आपण करू नयेत. त्यातील पहिल आणि सर्वात महत्त्वाचे कार्य ते म्हणजे शनिवारी कोणत्याही परिस्थितीत मिठाची खरेदी करू नये.
मीठ खरेदी करून आपल्या घरात आणू नये. शनिवारी मीठ खरेदी केल्यास आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो असे हिंदू धर्मशास्त्रात नमूद आहे. सोबतच घरामध्येसुद्धा दुःख, दरिद्रता या गोष्टी निर्माण होतात. मिठाप्रमाणेच या दिवशी तेल, चामडे, काळे तीळ, काळ्या रंगांचे बूट, लोखंडी साहित्य या गोष्टींची सुद्धा खरेदी करणं आपण टाळावं.
कलम म्हणजेच पेन आणि कागद यांचे सुद्धा खरेदी शनिवारी करण्यास धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे. या दिवशी 3 दिशांना आपण यात्रा म्हणजे प्रवास करण टाळावं अन्यथा आपण ज्या कामासाठी जात आहात ते काम असफल म्हणजे अयशस्वी होण्याची दाट शक्यता असते. या दिशा आहेत पूर्व, उत्तर आणि ईशान्य.
ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्यामधील दिशा आणि जाण फारच महत्त्वाच आहे तर अशा वेळी आपण पाच पावले पाठीमागे जावं, 5 पावलं उलट जाव. तोंडामध्ये थोडं अद्रक म्हणजेच आलं टाकावा, आल्याचा तुकडा टाकावा आणि नंतर आपण या दिशांना प्रवास करू शकता.
या तीन दिशांपैकी विशेष करून पूर्व दिशेला दिशा शूल मानण्यात आलेला आहे आणि म्हणूनच ही दिशा शक्यतो टाळायला हवी. मात्र जाणं खूप आवश्यक आहे तर हा उपाय आपण करू शकता. शनिवारच्या दिवशी शनिदेवांना सर्वात अप्रिय असलेली गोष्ट ती म्हणजे दारू.
या दारूचं कोणत्याही प्रकारे सेवन आपण या दिवशी कृपया करू नका अन्यथा आपल्या जीवनामध्ये शनीच्या अवकृपेने खूप मोठ्या अडचणी संकटं दुःख कष्ट हे निर्माण होऊ शकतात. मित्रांनो आपल्या घरात जर एखादी विवाहित मुलगी असेल तर तिला तिच्या सासरी आपण या दिवशी कृपया पाठवू नका. शनिवारचा दिवस मुलींना सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानण्यात आलेला आहे.
या दिवशी लाकूड, कोळसा किंवा लोखंडी वस्तू यांची खरेदी करून त्या घरी आणण्याचा सुद्धा हिंदु धर्मशास्त्र मनाई करत अन्यथा जीवनात कष्ट निर्माण होऊ शकतात. शनिवारी केस कापणे, नखे कापणे या गोष्टी सुद्धा वर्ज्य माणन्यात आलेले आहे. शनिवारी दुधाच आणि दह्याच सुद्धा सेवन आपण करू नये.
जर करायचं असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद किंवा गूळ टाकून आपण सेवन करावे जेणेकरून त्याचे दोष लागणार नाहीत. शनिवारी वांग किंवा आंब्याचं लोणचं, लाल मिरची या वस्तू खाण्यापासून सुद्धा आपण दूर राहावं. या दिवशी आपण असत्य म्हणजेच खोट बोलू नये.
कारण जे शनी देव आहेत, शनी महाराज आहेत ते न्यायाची देवता आहेत. आपण जे जे काही चांगली कर्म करतो त्याचं ते आपल्याला चांगलंच फळ प्रदान करतात. मात्र जी काही दुष्कृत्ये व वाईट कर्मे आपल्या हातून घडतील त्याची अचूक शिक्षा देण्याचं कार्य हे न्याय देवता शनी महाराज करत असतात आणि म्हणून शनिवारी कोणत्याही परिस्थितीत आपण खोटं बोलायचं नाहीये.
मित्रांनो या दिवशी कोणत्याही गरीबाचा अंध अपंगांचा किंवा एखाद्या विधवा महिलेचा आपण कोणत्याही परिस्थितीत अपमान करु नका. खूप मोठे शनी दोष हे आपल्याला भोगावे लागू शकतात. मित्रांनो शनिवारच्या दिवशी या काही नियमांच आपण पालन केल्यास शनीची अवकृपा आपल्यावर होणार नाही.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.