सर्व प्रकारच्या आजारावर स्वामी समर्थांची ही सेवा करावी.

नमस्कार मित्रांनो,

आरोग्यसेवा सर्व प्रकारच्या आजारावर स्वामींनी सांगितलेली ही आरोग्यसेवा आहे. जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात, स्वामींची सेवा करतात आणि तुम्हाला हवी असेल, आरोग्यसेवा पाहिजे की, आरोग्यसेवा आम्ही रोज करू शकतो. जेणे करून आमचे स्वस्त, आमच्या आरोग्यसेवा चांगले राहिल. तर मित्रांनो ही सेवा नक्की करावी.

मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ. ओम हनुमंताय नमः . ॐ दाताय नमः . ॐ नमः शिवाय आणि ॐ मच्छिंद्रनाथय नमः हा संपूर्ण एक मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्हाला तीन माळ करायचा आहे. या झाल्यानंतर तुम्हाला 3 माळ ॐ ऱ्हाम ऱ्हिम रक्ष रक्ष शिव गोरक्ष या मंत्राचा जप सुद्धा 3 माळी करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र बोलायचे आहे. त्यानंतर 3 वेळेस तुम्हाला म हा मृ त्युं ज य मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर एक वेळेस तुम्हाला कालभैरव अ ष्ट क बोलायचे आहे. आणि त्यानंतर 1 वेळेस मारुती स्तो त्र बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रमधील 14 वा अ ध्या य 1 वेळेस वाचायचं आहे. तरी खूप मोठी सेवा आहे परंतु तुम्हाला जर एवढं सगळं करायची जमत नसेल तर तुम्ही जे 11 वेळेस आहे, 3 वेळेस आहे, 3 माळी आहे ते तुम्ही एक एक वेळेस करू शकतात.

ज्या मंत्राचा 3 माळी सांगितले आहे तिथे 1 माळ करू शकता. जो मंत्र 11 वेळा सांगितलेलं आहे तो एक वेळेस करू शकतात. जर तुम्हाला जमत नसेल तर, पण ही सेवा सं पू र्ण करायला पाहिजे. तुम्ही संख्या कमी जास्त करू शकता पण सेवा सं पू र्ण करायला घेतली पाहिजे. यासाठी मित्रांनो तुमच्याकडे आ यु र्वे दि क अगरबत्ती असली पाहिजे. तुम्ही स्वामींच्या केंद्रात किंवा अशा ठिकाणी जिथे अगरबत्ती मिळतं त्यांना खास करून सांगा की, आम्हाला केमिकल नसलेली आ यु र्वे दि क अगरबत्ती पाहिजे.

इतर कोणतीही अगरबत्ती या सेवेमध्ये वापरायची नाही. फक्त आ यु र्वे दि क केमिकल नसलेली अगरबत्ती तुम्हाला घ्यायचे आहे. आणि ती अगरबत्ती लावूनच तुम्हाला ही सेवा करायचे आहे. त्यासोबत तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक तुळशीचे पानं टाकून त्या तांब्यावर आपला डावा हात ठेवून सेवा करायची आहे.

म्हणजे एका तांब्यात पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये तुळशीचे पान टाकायचं अन् त्या तांब्यावर आपला डावा हात ठेवायचा. म्हणजे तो डाव्या बाजूलाच तांब्या ठेवायचा आणि हात ठेवून मग आपण उजव्या हाताने माळी करू शकतो किंवा जे वाचन आहे जे मंत्र जप आहे, जे स्तोत्र आहे, जे पारायण आहे ते आपण करू शकतो. सेवा पूर्ण झाल्यावर जी आ यु र्वे दि क अगरबत्ती आपण लावलेली आहे. जिच्यामध्ये के मि क ल नाही त्याची जी पडलेली रक्षा असेल ती सगळ्यात आधी कपाळाला लावावी.

त्यानंतर गळ्याला लावावी आणि थोडी रक्षा जिभेने चाटून घ्यावी. आणि उरलेली रक्षा थोडीफार चिमूटभर तांब्यामध्ये टाकून ती आपण पाण्यामध्ये पिऊन घ्यावी. तसेच जे तुळशीचे पान आपण टाकलेल आहे तेसुद्धा चाऊन आपण खायचं आहे. तांब्यातील तीर्थ शि ल्ल क ठेवू नका. सगळं पाणी तुम्हाला प्यायचे आहे.

मित्रांनो ही सेवा सकाळ संध्याकाळ करायची असते पण तुम्हाला दिवसातून एक वेळेस जमली तरी चालेल. मित्रांनो ही सेवा एकाच व्यक्तीसाठी असून याच्यातील तीर्थ दुसरे कोणीही घेऊ नये आणि सेवा सलग 21 दिवस करावी. मित्रांनो ही सेवा करत असताना आपण पोटभर जेवण करावे आणि कुठलेही मनात वाईट विचार आणू नये.

मनापासुन श्रद्धेने ही सेवा करावी. जो व्यक्ती ही सेवा करत आहे त्याच व्यक्तीला या सेवेचा लाभ होईल. जर भरपूर व्यक्ती असतील त्यांना ही सेवा करायचे आहे, त्यांना लाभ हवे असेल तर त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे. जो व्यक्ती तांब्यावर हात ठेवून ही सेवा करेल त्याच व्यक्तीला या सेवेचा लाभ मिळेल आणि त्याच व्यक्तीने ते तीर्थ सुद्धा प्यायचं आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *