आम्ही मांसाहार करतो मग स्वामी सेवा कशी करायची? मांसाहार करून स्वामींची पूजा करावी की नाही?

नमस्कार मित्रांनो,

ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी सेवा करावी की करू नये. मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा व इतर देवांची सेवा कराव्यात की नाही. पण मांसाहार करायचं नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतो. आपल्या सर्वांच्या मनात खूप सार्‍या प्रश्नांचा वादळ निर्माण होतं.

जसे की, आम्ही मांसाहार करतो. मग स्वामी सेवा कशी करायचे? मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्यादिवशी सेवा करावी की नाही किंवा ती कशी करावी? अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात.

त्यामुळे असे खुप सारे प्रश्न मनात निर्माण होत असताना सेवेत लक्ष लागणं थोडं कठीणच असतं. आजच्या या लेखामध्ये आपल्या मनात चाललेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण या लेखामध्ये करणार आहोत. या प्रश्नावर ठाम उत्तर द्यावं इतका माझा अधिकार नाही.

पण मला जे मनापासून वाटतं ते आज मी तुमच्या समोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते पण मांसाहार या शब्दामुळेच आपली बऱ्यापैकी मानसिकता न का रा त्म क होते.
आपल्याला मनापासून वाटत असत की, स्वामी सेवा करावी.

आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो. हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अ न्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंकाकुशंका येत नाहीत. पण तसेच जेव्हा तुम्ही मांसाहार अ न्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या स्वतःला अयोग्य समजता. आणि त्यामुळे आपल्या देवतेची आपल्या स्वामींची सेवा करणं भक्ती करणं अयोग्यच असते.

जेव्हा घरात मांसाहार जेवण बनवलेले असते तेव्हा घरातील वातावरण रोजच्या दिवसासारखा नसतो. त्या दिवसात थोडासा बदल असतो. जर तुम्ही लक्ष दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल त्यादिवशी घरात अशांतता वाढते, घरात वादही होतील. म्हणूनच
मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो. मग आता यावर उपाय काय करायचा? तर मित्रांनो जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केला असेल तेव्हा स्वामी सेवा न केलेलीच बरी.

आणि तसेही स्वामी भक्त सेवा करणारही नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी आपला तो दिवस स्वामी सेवे विना वाया गेला असे समजावे. कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य भिडले नाही तो दिवस गेला पायी तया यमाशी करूणा नाही करावे पुण्य तात्काळ या वाक्याचा अर्थ आहे. ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे.

पण त्या यमाला नसते त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते. म्हणून मांसाहार यामुळे आपला तो 1 दिवस वाया गेला. एवढे मात्र नक्की आहे. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले. पण आपण आपल्या मनालाच प्रश्न करायचं की, मी स्वामींची सेवा करतो. स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेलं? याच उत्तर तुम्ही स्वतःच शोधण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजचा उद्देश नाही. ही माहिती अनेक माध्यमाच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याच कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *