नमस्कार मित्रांनो,
कोण आपल्याला कधी कायमचं सोडून जाईल हे सांगता येत नाही. आता तर अगदी कमी वयात देखील मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे लोकांना मृत्यूची भीती वाटायला लागली आहे. मृत्यूच्या वेळी कसे वाटते किंवा मृत्यूपूर्वी चिन्हे कशी दिली जातात हे जाणून घेण्याची सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता असते.
धार्मिक ग्रंथांमध्ये मृत्यूबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. यामध्ये मृत्यू, त्यानंतरचा आत्म्याचा प्रवास आणि पुनर्जन्म यांच्याबद्दल बरंच काही सांगण्यात आलं आहे. गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यूपूर्वी माणसाच्या शरीरात कोणते बदल होतात आणि त्याला कसे वाटते.
मृत्यूपूर्वी मिळतात हे संकेत
1) मरण्यापूर्वी माणसाला अनेक प्रकारची चिन्हे दिसतात. मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी, त्याच्या शरीराच्या अनेक भागांवर परिणाम दिसू लागतो. व्यक्तीची जीभ काम करणे थांबवते, ती चव गमावू लागते. बोलण्यात अडचण येते.
2) गरुड पुराणात सांगितले आहे की जर मृत्यू जवळ आला असेल, तर व्यक्तीला सूर्य आणि चंद्राचा प्रकाश दिसणे बंद होते.
3) मृत्यूपूर्वी व्यक्तीच्या शरीरात किंचित पिवळसरपणा किंवा पांढरेपणा दिसू लागतो. जणू त्याच्या शरीरातील रक्त कमी होत चालले आहे.
4) मरणासन्न व्यक्तीला आपली सावली दिसत नाही. हे ती व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ असल्याचे लक्षण आहे.
5) त्याच वेळी, मृत्यूच्या दोन-तीन दिवस आधी, व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला अदृश्य शक्तींचे अस्तित्व जाणवू लागते. त्याला यमराजाचे दूत दिसू लागतात. यमराजाच्या दूतांना पाहून तो घाबरतो म्हणून जवळ उभे असलेले लोकही त्याला दिसत नाहीत.
6) याशिवाय मृत्यूच्या काही वेळापूर्वी व्यक्तीच्या शरीरातून विचित्र वासही येऊ लागतो.
7) गरुड पुराणानुसार, मृत्यूच्या 24 तास आधी व्यक्तीला आरशात आपला चेहरा दिसणे बंद होते. तेल किंवा पाण्यातही त्याचा चेहरा दिसत नाही.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.