मनात नेहमी वाईट विचार आणि निगेटिव्ह विचार येतात का? फक्त ही एक गोष्ट करा.

नमस्कार मित्रांनो,

मनात नेहमी वाईट किंवा निगेटिव्ह विचार येतात का? खूप टेन्शन असते का? कसला तरी त्रास होतोय का? मनातल्या मनात कसले तरी दडपण आले का? काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे मिळत नाहीये का? तर ही एक गोष्ट करा, हे एक काम करा.

सगळे वाईट विचार सगळे निगेटिव्ह विचार, जेवढे पण टेन्शन असेल ते सगळं लवकरात लवकर तुमच्या मनातून तुमच्या डोक्यातून निघून जाईल आणि हा चमत्कार भरपूर लोकांसोबत झाला आहे. तुमच्यासोबत देखील होईल.

फक्त मन लावून विश्वास ठेवून हे काम ही एक गोष्ट करा आणि विश्वास तुम्हाला स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर ठेवायचा आहे. कारण मनात वाईट विचार, निगेटिव्ह विचार आणि टेन्शन हे कोणी देऊन जात नाही हे आपण स्वतः निर्माण करतो.

सारखा सारखा विचार करून जर विचार करणेच आपण बंद केले तर कोणाही टेन्शन येणार नाही आणि भरपूर लोक असतात ते नेहमी स का रा त्म क पॉझिटिव्ह विचार करतात. नेहमी आनंदी राहतात. कारण ते विचार कमी करतात त्यामुळे ते नेहमी हसत खेळत राहतात.

तर तुम्हाला हे काम करायचे आहे. यामुळे तुमचे विचार निगेटिव्ह विचार वाईट विचार टेन्शन सगळं काही हळुवारपणे कमी होईल आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तर तुम्हाला हे काम केव्हाही करता येईल. कोणत्याही वेळी करता येईल.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला हे काम दररोज करायचे आहे न चुकता रोज हे काम तुम्हाला करायचे आहे. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा, मध्यरात्री उठून करा चालेल पण अवश्य करा. हे काम म्हणजे काय?

तर तुम्हाला एका शांत जागेवर कुठेही जिथेही तुम्हाला शांतता मिळेल. बेडरूममध्ये, हॉलमध्ये किंवा टेरेसवर कुठेही जिथे तुम्हाला शांतता मिळेल, कोणी डिस्टर्ब करणार नसेल तिथे तुम्हाला शांत बसायचे आहे. डोळे बंद करायचे आहेत.

फक्त डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे मनातल्या मनात तुम्हाला बोलायचे आहे. 5 मिनिट बसा, 10 मिनिटे बसा, 15 मिनिटे बसा जेवढा वेळ तुम्हाला बसता येईल तेवढा वेळ बसा. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी थोडा त्रास होईल.

बसणं होणार नाही, विचार येतील पण रोज बसा, रोज करा. तर हळूहळू या गोष्टीची सवय होईल आणि आधी मिनिटे बसाल तर नंतर 10 मिनिट, 15 मिनिटात वाढत जाईल आणि तुम्हाला या कामाने चांगला वाटू लागेल. मनातील वाईट विचार, निगेटिव्ह विचार संपू लागतील.

हे ऑटोमॅटिक होत नाही हे स्वामींमुळे होतं. कारण ही एक प्रकारची सेवा आहे. एक प्रकारचा हा प्रयोग आहे. ते तुम्ही स्वतःवर करत आहात, स्वतःच्या मनावर करत आहात. तर हे सगळं तुमचे जीवन तुमचे आयुष्य आणि तुमचे शरीर स्वामीमय होईल.

तुम्ही फक्त आधी 5 मिनिटे स्वतःला द्या, नंतर 10 मिनिट द्या लगेच दहा मिनिटे देऊ नका. एक महिन्यानंतर दहा मिनिट सुरु करा. नंतर 15 मिनिट सुरु करा असं करत राहा रोज करता राहा. हे एक प्रकारचे मेडिटेशन आहे.

मेडिटेशनचे फायदे तुम्हाला तर माहित आहे. फक्त मेडिटेशनमध्ये ओम बोलायला लावतात. पण इथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ बोलायचं आहे नक्की करा. मनातले वाईट विचार, निगेटिव्ह विचार कायमचे संपून जातील.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *