नमस्कार मित्रांनो,
आज पुन्हा एकदा नवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आजची माहिती सांगण्यास सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ आज आपण महिलांची मासिक पाळी या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. मासिक पाळी आल्यावर महिलांनी सेवा किंवा पूजा करावी की, करू नये असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला असतो.
पूर्वीपासूनची असलेली प्रथा आहे की, स्त्रियांनी मासिक पाळीत सेवा करू नये अपशकुनी असते. त्याने देवाचा कोप होऊ शकतो. तेव्हा देवाच्या जवळ जायचं नाही ते चांगलं नसतं. अशा जुन्या लोकांच्या धारणा आहेत. बऱ्याच महिला या सगळ्या गोष्टी पाळत नाहीत. काही महिला या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. तसं पाहायला गेलं तर परमेश्वराने आपल्या सगळ्यांनाच बनवले आहे. म्हणजे महिलांना सुद्धा परमेश्वरानेच बनवली आहे.
मासिक पाळी म्हणजे काय तर महिलांच्या लैंगिक भागातून होणारा रक्तस्राव. यामागचे लॉजिक असे आहे की ते एक प्रकारचे अशुद्ध पाणी आहे. जे त्यांच्या शरीरातून 5 दिवस सतत निघत असते तरी या काळात महिलांनी पूजा करावी की, नाही तर यावर माझ्या प्रामाणिकपणे उत्तर आहे की नाही. बरेच असे स्वामी भक्त महिला या मासिक पाळीच्या दरम्यान मठात किंवा स्वामींच्या केंद्रात जात नाही आणि ते योग्य आहे. आता आपण या मागील कारण देखील जाणून घेऊयात. ते 5 दिवस महिलांच्या शरीरातील शुद्ध रक्त सतत सुरू असते.
महिलांच्या शरीरात रक्तस्त्राव सतत लागून नसतो. त्यामुळे देवाजवळ किंवा देवाऱ्याजवळ जायचं नसते आपण रोज सकाळी आंघोळ करूनच देवाजवळ पूजा करायला जातो की, न आंघोळ करतात असे सेवेला बसतो, नाही ना तसेच काहीसे आहे. आपल्या घरात मासिक पाळी आल्यावर त्या स्त्रीच्या सानिध्यात बरेच लोक येतात. जसे की, त्यांचे कुटुंबीय त्या 5 दिवसात त्या स्त्रीचा आणि त्यांच्या कुटुंबीयांना सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्पर्श होत असतो.
त्यामुळे शक्यतो या कालावधीत कुटुंबीयांनी सेवा किंवा पूजा सकाळीच करावी. सायंकाळी करू नये. मासिक पाळी आलेल्या महिलेने जपमाळ स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्र यासारख्या प्रविष्ट गोष्टींना हात लावू नये. हे 5 दिवस नित्य सेवा करणे श्रेयाने टाळावे. पण नामस्मरण नक्की करू शकता. कारण नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही. त्यामुळे फक्त 5 दिवस नामस्मरण करायचे.
घरात जर स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तर शक्यतो त्या स्त्रीने बनवलेला तो नैवेद्य नसावा. बऱ्याच स्त्रिया या तिसऱ्या दिवशी आंघोळ करून देवघरात जातात तर असे करू नये. स्त्रियांनी पाचव्या दिवशी केसांवरून आंघोळ करून मग स्वतः देवाला अंघोळ घालावी व नित्य सेवा करावी. अन्यथा मला एवढेच सांगायचे आहे की, या काळात स्त्रियांनी देवाजवळ जाऊ नये.
याबद्दल बऱ्याच लोकांचे गैरसमज आहे. लोकांना असे वाटते की ही अंधश्रद्धा आहे. जसे की मी सांगितले की, देव हा पवित्र आत्मा आहे. देवघर स्वच्छ असावे आणि अशा काळात या रक्तस्रावाचा कुठेही स्पर्श होऊ नये म्हणून हे नियम पाळले जातात. अशाप्रकारे महिला स्वामी भक्तांनी आपल्या मासिक पाळीमध्ये हे नियम पाळले पाहिजेत.
टीप – वरील माहिती हि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशनुसार तसेच इतर शास्त्रांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.