नमस्कार मित्रांनो,
आपण सर्वजण स्वामींचा आ शी र्वा द मिळावा म्हणून आपण स्वामींची सेवा करत असतो. पण काही जण सेवा करताना मनात इतर वेगवेगळे भाव ठेवून सेवा करत असतात म्हणजेच श्री स्वामी समर्थ यांची सेवा करताना इतरत्र आपले ध्यान असणे आणि आपण स्वामी सेवा करत होतो असे दाखवणे. या अश्या चुकीच्या सवयींमुळे स्वामींचा आपल्याला आ शी र्वा द मिळत नाही. स्वामींना आवडणार्या काही गोष्टी आजच्या माहितीमध्ये आपण पाहणार आहोत.
ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. भक्तहो अशा काही गोष्टी असतात त्या चुकूनही करू नका. त्यामुळे स्वामींची कृपा दृष्टी आपल्यावर राहणार नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या करणे योग्य नाही. आपण केलेली स्वामींची सेवा याचा प्रचार करत राहू नये. स्वामींबद्दल चुकीची माहिती कोणाला सांगू नये. आपल्यापासून स्वामींना फक्त हवे असते ते म्हणजे मनापासून केलेली श्रद्धा, मनापासून केलेली आराधना या गोष्टी स्वामींना हव्या असतात.
कुठल्याही श्रद्धेची त्यांना देखावा आवडत नाही. आपण स्वामींचा आ शी र्वा द प्राप्त करण्यासाठी त्यांच्या आवडत्या काही गोष्टी केल्या पाहिजे. त्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया आणि कशा करायच्या ते पाहून घेऊ. आज आपण पाच अशा गोष्टी पाहणार आहोत त्यातील पहिले आहे ती म्हणजे सगुण उपासना म्हणजे या उपासनेमध्ये कोणतीही मनात इच्छा न ठेवता फक्त स्वामींची आराधना करणे. श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करणे.
कितीही वेळ केला तरी चालेल. 1 माळ किंवा 2 माळ किंवा 11 माळी केला तरी चालेल. ही उपासना करण्यासाठी कोणतीही अपेक्षा मनात नसणे. मनोभावाने ही सेवा करणे आणि या सेवेत खंड पडू देऊ नका. रोज नित्यनियमाने सेवा करत जा. दुसरी उपासना म्हणजे अन्नदान. अन्नदान हे एक श्रेष्ठ दान आहे जे गरजू लोक आहेत त्यांना अ वश् य अन्नदान करावे.
बऱ्याच लोकांना रोज जमत नसेल तर महिन्यातून एकदा तरी अन्नदान करावे किंवा वर्षातून एकदा केले तरी चालेल. पण अन्नदान अ व श्य करावे. जर का अन्नदान आपल्याकडून होत नसेल तर कमीत कमी एखाद्या गरजू व्यक्तीला काही तरी मदत अ व श्य करणे. ती कोणत्याही स्वरूपाची असली तरी चालेल. भक्तहो तिसरी गोष्ट म्हणजे दत्त महाराजांचे नामस्मरण. तुम्हाला माहिती असेल दत्त महाराजांचे रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत.
त्यामुळे दत्त महाराजांचे नामस्मरण करत जावे. फक्त दत्त महाराजांचे नव्हे तर स्वामींचे केली तरी चालेल. स्वामींची इच्छा एकच असते की, नामस्मरण करत जावे ते कधीही सोडून देऊ नये. नंतरची गोष्ट माणूस जोडण्याची आवड. जे व्यक्ती स्वामींच्या मठात जातात, केंद्र जातात त्यांना माहिती असते की, माणसे कशी जोडायची. त्यांना माहिती असते की, स्वामींची सेवा केल्याने किती चांगल्या गोष्टी आयुष्यात येतात.
हे सगळ्याचे मनोबल त्याच्यात आलेले असते आणि असे लोक लवकर माणसे जोडता. सर्वात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे आहे त्या परिस्थितीत समाधानी राहा. जे काही देवाने दिले आहे त्या गोष्टीत समाधानी राहण्याची सवय करून घ्या. विनाकारण दुसऱ्याला मिळणाऱ्या गोष्टीवर मनात कडूपणा आणू नये. किंवा देवाने आपल्याला काहीच दिले नाही असेच सतत बोलत बसू नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.