चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे 7 संकेत

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असते. कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी कोणासाठी वाईट. कधी कधी आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल. वेळेवर कोणाचेही बंधन नाही. कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर वाईट वेळ आल्यास त्या व्यक्तीलाही झुकावेच लागते. तुम्हीही कितीतरी लोकांना श्रीमंतीतून गरीबीकडे येताना बघितलेच असेल.

मग आपण म्हणतो वेळेपुढे कोणाचेही काहीही चालत नाही. काय परिस्थिती होते यांची आणि आज कशी वेळ आली यांच्यावर, अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचे जीवन बालपण, तरुणपण व म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच आहेत. जी व्यक्ती बालपण खूप कष्टात काढते त्यांचे प्रौढपण मजेत जाते.

तर ज्यांचे बालपण खूप आनंदात व मजेत गेलेले असेल ज्या वस्तूकडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल त्यांचा उत्तर काळ हा कष्टाचा जातो. याला काही अपवादही असतात पण ते क्वचितच. आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचे बालपण खूप कष्टात व दुःखात गेलेले असते. प्रत्येकाला कधी सुख तर कधी दुःख हे पचवावेच लागते.

प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत राहते. ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात. जर तुम्ही लक्ष दिले या इशाराणा समजून घेऊन तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनांविषयी आपण जाणू शकतो. या संकेतांमुळे तुम्हाला समजते की, यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत झाला आहे.

दुःखाचा व कष्टाचा आता नाश होणार आहे. कधी कधी आपण सकाळी उठलो की, आपल्याला खूप फ्रेश व उत्साही वाटते. आपल्याला अचानक खूप आनंदी असल्यासारखे वाटते किंवा आरशात आपले तोंड पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक एक प्रकारची लाली पसरलेली आपल्याला दिसते. हे या गोष्टीचे संकेत आहेत की, तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे.

व तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात तुम्हाला सफलता मिळेल. काही व्यक्ती यावर विश्वासही ठेवणार नाही. परंतु पशु पक्षीही चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात. जर एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ती चांगल्या वेळेची निशाणी आहे. जर एखाद्या माकडाने अचानक आंबा खाऊन त्याची कोय जर आपल्या घरात टाकली तर आपली चांगले वेळ सुरू होत आहे.

असा याचा अर्थ होतो. घरात धन धान्याची बरकत होते. जर सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर पैसे दिले तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. तर समजून जा की, तुमच्या चांगल्या वेळीचे आता सुरुवात झाली आहे. जर तुम्ही सकाळी सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलात व एखाद्या लहान बालक तुम्हाला खळखळून हसताना दिसले तर हे सुद्धा भगवंताद्वारे चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा आहे.

जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की, आजचा दिवस आपलाच आहे. आपण ज्या कामात हात टाकलं ते काम नक्कीच पूर्ण होईल आणि आपल्याला सफलता मिळेल.

असे समजा की, भगवंतानी तुमच्यावर कृपा केली आहे आता तुम्हाला धन प्राप्ती होईल हा या गोष्टीचा इशारा आहे की, आता तुमचे सर्व चांगले होणार आहे. हे आहे चांगली वेळ येण्याचे संकेत. जर तुमच्याबरोबरही असे काही होत असेल,

तर तुम्हाला आता कुठल्याही प्रकारची चिंता करण्याचे काहीही कारण नाही. कारण तुमच्यासाठी स्वतः भगवंत इशारा देत आहे की, आता तुमचे आता चांगलेच होईल व त्यांच्या मागे स्वतः भगवंत आहेत. त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *