नमस्कार मित्रांनो,
हळद सर्व शुभमंगल कार्यांमध्ये सर्वात आधी हळदीचा वापर केला जातो. आपल्या रोजच्या वापरातही असतेच. स्वयंपाक करताना पदार्थांमध्ये हळद वापरली तर त्या पदार्थांचे रूपच पालटते व पदार्थ लज्जतदारही बनतो. हळद ही जंतुनाशक आहे म्हणून हळदीचा वापर काही लागले, खरचटले तर यावरही केला जातो.
इतकी ही गुणकारी हळद विविध उपाय व तोडग्यांमध्येही वापरली जाते. हळदीचा उपयोग करून आपण आपल्या जीवनातील विविध संकटांना दूर सारू शकतो. तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठीही हळदीचे विविध उपाय आपल्या ज्योतिष शास्त्रात दिलेले आहे. शास्त्रामध्ये हळद ही खूपच शुभ मानले गेले आहे.
म्हणून कोणत्याही शुभ व मंगल कार्यात सर्वात आधी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये विविध गुणधर्म आहेत व दैवीशक्ती आहे. अशा सर्व गुणसंपन्न हळदीचा एक खूप खास असा उपाय आपण पाहणार आहोत. जर आपल्या जीवनात जर काही संकटे असतील, अडचणी असतील त्यापासून आपल्याला सुटका मिळवायचे असेल,
आर्थिक अडचण असेल, आपल्या कष्टाच्या मानाने हातात पैसा येत नसेल किंवा हातात पैसा येत असेल, परंतु तो टिकत नसेल आपल्या कौटुंबिक व वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील, मतभेद असतील, घरात नेहमी भांडणतंटे व वादविवाद होत असतील, नोकरी व्यवसायसंबंधी जर काही अडचणी असतील,
धन प्राप्तीची इच्छा असेल तर या सर्व इच्छा व मनोकामनाची पुरती होण्यासाठी तसेच या अडचणी व बांधापासून सुटका मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. यासाठी आपल्याला आपल्या दैनंदिन वापरातील हळदीचा वापर करायचा आहे. अगदी सोपा व साधा आहे.
आपल्याला फक्त एक वस्तू आपल्या हळदीच्या डब्यात ठेवून द्यायचे आहे. कधी कधी असे होते की, आपल्या व्यवसाय अगदी तेजीत चालत असतो, आपली प्रगती होत असते नोकरी व्यवसाय अगदी मस्त चाललेले असतात. घरात अगदी छान आनंदी वातावरण असते आणि अचानक घरात वादविवाद, भांडण तंटे होऊ लागतात.
व्यापार-व्यवसाय मंदावतो, नोकरीमध्ये काही अडचणी येऊ लागतात, घरात अशांतता निर्माण होते, पैशाला पैसा लागत नाही घरात आर्थिक अडचणी जाणवू लागतात त्यावरून घरातील सदस्यांशी खटके उडू लागतात, कोणी ना कोणी घरात सतत आजारी राहू लागते, आपल्याला समजत नाही की हे असे का होत आहे?
परंतु हा सर्व करणी, भानामतीचा प्रकार असतो, काळी जादू असते. आपली प्रगती कोणाला बगवत नाही म्हणून असे प्रकार होत असतात. आपल्या आसपास राहणारे आपल्याशी गोड गोड बोलणारे असे काही आपले गुप्त शत्रू असतात. जे नेहमी आपले वाईट व्हावे यासाठी काही ना काही गुप्त कारवाया करीत असतात.
या सर्व जादूटोणा, करणी, भानामतीपासून आपली सुटका होण्यासाठी या सर्वांपासून आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यास ज्या व्यक्तीने आपल्यावर करणी केली ती त्याच्यावरच उलटेल व आपल्यावर त्या वाईट शक्तींचा वाईट प्रयोगांचा काहीही प्रभाव पडणार नाही.
त्यासाठी तुम्हाला फक्त चार ते पाच सुक्या लाल मिरच्या आपल्या हळदीच्या डब्यात ठेवून द्यायच्या आहेत. या मिरच्या अगदी कोरड्या खणखणीत असाव्यात. ताज्या मिरच्या अजिबात ठेवू नये. वाळलेल्या लाल मिरच्याच आपल्याला आपल्या हळदीच्या डब्यात ठेवायच्या आहेत. काही दिवसांनी या मिरच्या काढून आपण आपल्या स्वयंपाकात वापरू शकता.
हळदीच्या डब्यात ठेवलेल्या या मिरच्या आपल्याला थोड्या थोड्या दिवसांनी बदलायचे आहेत आणि आधीच्या मिरच्या आपल्याला स्वयंपाकात वापरून घ्यायचे आहेत. असे केल्याने जर तुमच्यावर कोणी करणी केली असेल, आपल्या कुटुंबावर जर काही वाईट शक्तीचा प्रभाव असेल तर त्यापासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण होईल.
आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी व संकटांपासून आपली सुटका होईल. हा उपाय अगदी साधा व सोपा आहे. त्यासाठी आपल्याला काहीच खर्च करण्याचीही आवश्यकता नाही. परंतु खरोखर खूप प्रभावी व परिणामकारक असा उपाय आहे.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.