गणपती विसर्जन केल्यानंतर नारळ सुपारी व इतर वस्तू यांचे काय करावे?

नमस्कार मित्रांनो,

आपण सर्वांनी आपल्या घरात मनोभावे गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. आपण श्रद्धा भावनेने व मनोभावे बाप्पांचे दहा दिवस पूजन करतो. दुसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी, सातव्या दिवशी, नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी गणपती बाप्पांचे वि स र्ज न करतो. आपण गणपतीचे वि स र्ज न करताना गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करतो.

बाप्पांना ज्या कापडावर बसविले होते ते कापड, तांदूळ, नारळ, सुपारी, कलश, दक्षिणा या सर्व वस्तू तशाच राहतात. मग आपल्याला या सर्व वस्तूंचे नेमके काय करावे हे सुचत नाही. म्हणून या सर्व वस्तूंचे वि स र्ज न नेमके कशा प्रकारे करावे किंवा या वस्तुंचा नेमका काय वापर करावा हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. आपण गणपतीला ज्या वस्त्रावर स्थापन करतो ते वस्त्र नवीनच घेतलेली असते.

म्हणून त्या वस्त्राचा वापर आपण देवघरात करू शकतो. देवघरातील देवांना स्थानापन्न करण्यासाठी देवघरात आपण हे कापड हंतरु शकतो किंवा देवघरात हे कापडं हंतरण्याची तुमची इच्छा नसेल तर देवघर पुसण्यासाठी किंवा देवपूजेच्या वेळी हात पुसणे, दिवा कलश पुसणे यासाठीही या कापडाचा वापर तुम्ही करू शकता.

ज्यावेळी आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करायला नदीवर, तलावावर, समुद्रावर जातो त्यावेळी ज्या ठिकाणी आपण बाप्पांचे विसर्जन करतो त्या ठिकाणची थोडीशी माती घेऊन घरी यावे व गणपती बाप्पांना ज्या ठिकाणी तांदळाचे स्वस्तिक किंवा मंडळ करून आपण बसविले होते त्या ठिकाणी ती माती ठेवून गणपती बाप्पांची आरती करावी. कारण आपण गणपतीची स्थूल रूपाचे विसर्जन केले असले तरी सूक्ष्म रूपाने गणपती बाप्पा तेथेच असतात.

जी समई किंवा दिवा चालू असेल ते तसेच चालू ठेवावे त्यातील संपूर्ण तेल संपेपर्यंत तो दिवा तेथेच ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी ती माती एखाद्या कुंडीमध्ये टाकून त्याला पाणी अ र्प ण करावे म्हणजे बाप्पांचा वास आपल्या घरात स्थायी रूपात राहील. त्यानंतरची तांदूळ बाप्पांना बसविण्यासाठी घेतले होते त्या तांदळाची खीर किंवा इतर गोड पदार्थ करून खावेत. कलशाखालील व नवग्रहांच्या खाली ठेवलेले तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाकून द्यावे. यामुळे आपल्या अन्नाला बरकत येते.

परंतु तुमचे ते तांदूळ धान्यात टाकण्याची इच्छा नसेल तर पक्षांना किंवा गाईला खाऊ घालावेत. सर्व सुपार्‍या व हळदीचा तुकडा एका कुंडीत किंवा इतर ठिकाणी जमिनीवर खडा काढून त्यात मुजवावे म्हणजे त्यांची झाडे येतील. सुपारीचे झाड घरात सजावटीसाठी खूप सुंदर दिसते. कलशातील दक्षिणा घरातील कन्येला द्यावे. जर आपल्या घरात कुवारी कन्या नसेल तर इतर कन्येला दिले तरीही चालेल.

कलशातील पाणी घेऊन संपूर्ण घरात ते पाणी शिंपडावे. जर घरात बाथरूम व टॉलेत असेल तर तो भाग टाळून ते पाणी शिंपडावे व उरलेले पाणी एखाद्या कुंडीत टाकावे. परंतु तुळशीला अ र्प ण करू नये. इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी अर्पण करू शकता. नारळ फोडून त्याचा प्रसाद घरातल्या सर्वांनी ग्रहण करावा.

तसेच जर खोबरे खाल्ले जात नसेल तर खोबऱ्याची बर्फी, मिठाई, खीर, लाडू असा काही तरी गोड पदार्थ करून त्या त्या खोबऱ्याचा वापर करावा. परंतु चटणी, भाजी अशा तिखट पदार्थांमध्ये ते खोबरे वापरू नये. पूजेचे फुले, पत्री, पाने इत्यादी नदीवर नि र्मा ल्य कलश असतात त्यात अ र्प ण करावेत. अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या सर्व वस्तूंचा योग्य प्रकारे वापर करावा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *