नमस्कार मित्रांनो,
काय बोलता आयुष्यात वाईट वेळ, संकटे, दुःख, येणारच नाही. कसं शक्य आहे हे? आयुष्य म्हटलं की, सुख दुःख येणारच. भलेही प्रत्येकाची इच्छा असते की, आपल्या आयुष्यात दुःख देऊ नये पण सुख दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे. कारण वेळ आपल्या हातात नसते. पण चाणक्य म्हणतात जर तुम्ही ही 5 कामे करत राहिलात तर तुमच्या आयुष्यात खूप कमी दुःख येईल किंवा आले तरी ते जास्त काळ टिकणार नाही.
चला तर मग बघुया कोणती आहे ते 5 कामे.
1) कोणत्याही मूर्खाला ज्ञान घ्यायचा प्रयत्न करू नका – चाणक्य म्हणतात मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे आहे. मूर्ख लोक कधीच कोणाचं ऐकत नाहीत. उलट त्यांना आपण काही सांगायला गेलो की, ते आवल्यावरच उलटतात, आपल्याशी वाद घालतात आणि अशामुळे आपण दुःखी होतो.
आपल्याला त्रास होतो. कधी कधी हे मूर्ख लोक आपल्या प्रगतीवरती जळतात आणि आपल्याला इजा पोहचवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे मूर्ख लोकांच्या नादी न लागलेलेच बरे. कारण अशा लोकांच्या नादी लागल्यामुळे आपला वेळ सुद्धा वाया जातो आणि मनस्ताप होतो तो वेगळाच. त्यामुळे कोणत्याही मूर्ख व्यक्तीला भेटीला कसलेही ज्ञान द्यायचा प्रयत्न करू नका.
2) सर्वांबरोबर विनम्रतेने रहा सभ्यतेने रहा – चाणक्य म्हणतात ह्या जगात प्रत्येक व्यक्ती उपयुक्त आहे. त्यामुळे कोणती व्यक्ती कधी आपल्या कामाला येईल सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांबरोबर विनम्रतेने वागा, सर्वांबरोबर चांगले संबंध ठेवा. कारण नम्रता हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. नम्र व्यक्तीला या जगात सर्व काही शक्य आहे.
जेव्हा कधी आपल्या आयुष्यात वाईट वेळ येते, संकटे येतात तेव्हा हेच जवळची व्यक्ती आपल्या मदतीला धावून येतात. मला कोणाची गरज नाही, मी कोणावर अवलंबून नाही असे अहंकारी वृत्ती ठेवू नका. कारण वेळ ही सर्वांवर येते. सर्वांबरोबर नम्रपणे वागल्यामुळे आपले नातेसंबंध दृढ होतात. आणि कठीण काळात हीच नाती आपल्या कामाला येतात.
3) परमेश्वराची प्रार्थना करत राहा कारण परमेश्वरावरचा विश्वास तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण करतो – आता कायजण म्हणतील आमचा देवावर विश्वास नाही. पण तुमचा या ब्रम्हांडावर तर विश्वास असेल, या निसर्गावर तर विश्वास असेल, आपल्याला निर्माण करणारी 1 शक्ती आहे ह्याच्यावर तर विश्वास असेल.
चाणक्य म्हणतात परमेश्वरावर दृढ विश्वास तुम्हाला कधीच हार मानू देत नाही, तुमच्या मध्ये साहस निर्माण करतो. त्यामुळे आयुष्यात कितीही वाईट वेळ आली तरी तुम्ही धैर्याने त्याला सामोरे जाता आणि त्याच्यावर मात करता. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा त्याची प्रार्थना करत राहा भक्ती करत राहा.
4) जिथे कुठे ज्ञान मिळेल ते मिळवत राहा आणि आयुष्यात नेहमी ज्ञानाला महत्त्व द्या – चाणक्य म्हणतात आपल्या सर्व दुःखाचे कारण एकच ते म्हणजे अज्ञान. कारण आपल्याकडे असलेलं ज्ञान आपल्याला दुखातून वाचवते. तुमच्या ज्ञानामुळेच समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळतो.
त्यामुळे ज्ञान मिळविण्यात कंजुषी करू नका. फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करायचा प्रयत्न करा. ज्ञान हे असे शस्त्र आहे जे तुम्हाला कोणत्याही संकटातून दुःखातून सहज बाहेर यायला मदत करते. त्यामुळे आयुष्यात ज्ञानाला महत्त्व द्या.
5) दानधर्म करत रहा गरिबी येणार नाही – गरीबीतून सुटका पाहिजे असेल तर चाणक्य सांगतात तुमच्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करत राहा. दान केल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते जे तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाते. दान केल्याने घरात सुख शांती समाधान वास करते. कारण निसर्गाचा नियम आहे क्रिया तशी प्रतिक्रिया. तुम्ही जे काय दान कराल ते अनेक पटीने तुमच्याकडे परत येणार आहे. दानधर्म केल्याने मनःशांती लाभते. मित्रांनो ही होती 5 कामे जी आर्य चाणक्यानी आयुष्यात वाईट वेळ न येण्यासाठी किंवा वाईट वेळेला सामोरे जाण्यासाठी सांगितलेली आहेत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.